जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

voting-machine1000
यवतमाळ : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदी अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात १५ एप्रिल पर्यंत जमावास बंदी राहणार आहे.
या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाºयांविरुध्द मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३७(१) व ३७ (३)अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे कळविले आहे. महावीर जयंती, हनुमान जयंती तसेच लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने हे आदेश लागू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − = one