
यवतमाळ दि.13 : गेल्या खरीप हंगामात चांगले पर्जन्यमान न झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढवले. जिल्ह्याची उत्पादन क्षमता घसरली. पर्यायाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणवर नुकसान सोसावे लागले. शासनाने दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे जिल्ह्यातील 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्यात दि. 8 जानेवारी रोजी मदत वितरीत करण्यासाठी 122 कोटी 80 लक्ष रुपये प्राप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सदर निधींचे वाटप मोठ्या प्रमाणवर सुरु आहे. दुसऱ्या टप्यात जिल्ह्याला नुकतेच 121 कोटी 61 लाख रुपये प्राप्त झाले आहे. दोन्ही टप्पे मिळून जिल्ह्यास एकूण 244 कोटी 41 लाख रुपये प्राप्त झाले असून आतापर्यंत यातील 120 कोटी रुपये 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण 4 लाख 47 हजार इतके शेतकरी दुष्काळी मदतीस पात्र असून त्यांना मदत वितरीत करण्यासाठी 625 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी बहुतांश निधी प्राप्त झाला असून त्याचे वाटप शेतकऱ्यांचा बँक खात्यात रक्कम जमा करुन सुरु आहे. आतापर्यंत यवतमाळ तालुक्यातील 14052 शेतकऱ्यांना 8 कोटी, कळंब 12178 शेतकऱ्यांना 6 कोटी 75 लाख, बाभुळगाव 10932 शेतकऱ्यांना 5 कोटी 91 लाख, आर्णी 12974 शेतकऱ्यांना 7 केाटी 80 लाख, दारव्हा 15278 शेतकऱ्यांना 9 कोटी 6 लाख, नेर 13552 शेतकऱ्यांना 7 कोटी 60 लाख, दिग्रस 10972 शेतकऱ्यांना 5 कोटी 98 लाख, पुसद 18443 शेतकऱ्यांना 9 कोटी 51 लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. उमरखेड तालुक्यतील 15363 शेतकऱ्यांना 7 कोटी 17 लाख, महागाव 13658 शेतकऱ्यांना 6 कोटी 98 लाख, राळेगाव 15265 शेतकऱ्यांना 8 कोटी 34 लाख, घाटंजी 16042 शेतकऱ्यांना 8 कोटी 43 लाख, केळापूर 162777 शेतकऱ्यांना 6 कोटी 82 लाख, झरीजामणी 9280 शेतकऱ्यांना 5 कोटी 84 लाख, वणी 17720 शेतकऱ्यांना 9 कोटी 27 लाख तर मारेगाव तालुक्यातील 12234 शेतकऱ्यांना 6 कोटी 10 लाख याप्रमाणे 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना 120 कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे.









