
कल्याण- गेल्या दिवसात याच महिन्यात लोणावळा येथिल कुमार रिसाॅर्ट येथे एका लहान ७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना समोर अाली होती,पण अात्तापर्यंत अारोपी पकडला गेलेला नाही,याचा निषेधार्थ कल्याण येथे जैन समाजातील महिला व पुरुषांनी हजारोच्या संख्येने,गांधी चौक ते कल्याण तहसिलदार कार्यालय पर्यत मौन मोर्चा काढला,व तहसिलदारला लेखी पत्र देऊन कुमार रिसाॅर्ट येथे झालेल्या बलात्काच्या अारोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावा,तसेच कठोर कार्यवाही करण्याचे या पत्यात जैन समाजाने केलेली असुन,या मोर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी गुलाबचंद कोठारी हे अमेरिकेहून अाले होते.व म्हटले कि, ही घटना लाज वाटण्यासारखी अाहे,पण जैन समाज मुंबई ला दिल्ली नाही बनू देणार.तसेच या राकेश मुथा यांनी सांगितले कि, या घटनेला येवढे दिवस उलटून गेले,तरीही अजून पोलिसांना अारोपीला पकडण्यात यश अाले नाही,जर पोलिसांनी अारोपीला लवकर पकडले नाही,तर जैन समाजातर्फे अजून मोर्चा काढण्यात येईल.व नितिन जैन या व्यक्तीने अारोप लावले कि,कुमार रिसाॅर्ट हे बीजेपीचे माजी अामदारचे अाहे,तर सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत तर नाही ना ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अाहे.









