ज्युनियर विश्वचषक- भारताचे आव्हान संपुष्ठात

दुबई- ज्युनियर(१९ वर्षाखालील) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत भारताचे आव्हान संपुष्ठात आले. शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत भारताने आठ बाद २२१ धावा केल्या होत्या. इंग्लंडने हे लक्ष्य अखेरच्या षटकात तीन गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले.स्पर्धेतील साखळी फेरीतील तिन्ही सामने भारतीय संघाने जिंकले होते. त्यामुळे उपांत्य फेरीसाठीची भारतीय संघाची दावेदारी प्रबळ मानली जात होती. मात्र इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्ठात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− two = 3