टीईटी : नऊ हजार उमेदवारांनी दिली परीक्षा

02_12_2012-2nwd08-c-2.jpg00
यवतमाळ, दि. १४ (प्रतिनिधी)-प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकपदासाठी आवश्यक टीईटी पात्रता परीक्षा आज रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रावरून घेण्यात आली. यामध्ये नऊ हजार उमेदवारांनी ही परिक्षा दिली.
शिक्षण विभागात शिक्षकांची पदे रिक्त असून, यापुढे टीईटीच्या अग्निदिव्यातून जाणाºया उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी मागील वर्षी ही परीक्षा घेण्यात आली. त्यात अपेक्षेप्रमाणे खूप कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र रिक्त जागा भरण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी चक्क सहा हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाही. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्टसाठी प्रथम आणि दुसºया पेपरसाठी १०हजार १४३ उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते. पहिला-दुसरा पेपर रविवारी सकाळ आणि दुपार दोन सत्रात घेण्यात आला. सकाळच्या सत्रात ४६६ तर दुपारच्या सत्रात ३०१ उमेदवार गैरहजर होते. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाप्रशासनाने कडोकोड बंदोबस्त ठेवून भरारी पथक नियुक्त केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven − 4 =