
कोल्हापूर – महाराष्ट्रात टोल विरोधात सतत आंदोलन करुनही टोलनाके बंद न करता टोलदर वाढवले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संतप्त कोल्हापूरकरांनी कळंबा येथील आयआरबीचा टोलनाका फोडला आहे.
टोलनाक्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या कॉ. गोविंद पानसरेंची हत्या होऊनदेखील सरकार टोल कंत्राटदारांविरुद्ध काही करत नाहीत अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.









