
नेर – तालुक्यातील वटफळी येथे दोन ट्रकच्या धडकेत एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. हा अपघात एवढा भयानक होता की दोन्ही ट्रकच्या कॅबीन चकनाचूर झाल्या असून मृतदेह काढण्यासाठी तब्बल सहा तासाचा वेळ लागला.
अमरावती वरून तुर घेऊन ट्रक (एम.एच. २०/ ए ए ८१९९) यवतमाळ मार्ग आदिलाबाद येथे जात होता. तर यवतमाळकडून दगडी कोळसा घेऊन औरंगाबाद येथे जाणाºया ट्रकची (टि.एन. ७७ / बि ८२३१) वटफळी या गावाजवळ जोरदार धडक झाली. यामध्ये गोविंद पुनास्वामी (४०) रा भरकसरा तामिळनाडू यांचा जागीच मृत्यू झाला. तर सारवनाथ कुमार (३१) रा. शेद्राभट्टी तामीळनाडू, अनिल रामसिंग सोनवाल (२१) रा. औरंगाबाद हे गंभीर जखमी झाले असून अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघाताची माहिती मिळताच जमादार श्रीकृष्ण गुल्हाणे, अरविंद जाधव, प्रतापसिंग ठाकुर यांनी घटनास्थळ गाठून जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. हा अपघात एवढा भयानक होता की, दोन्ही ट्रकच्या कॅबीन चकनाचुर झाल्या असून मृतदेह बाहेरकाढण्यासाठी तब्बल सहा तास लागले. या प्रकरणी नेर पोलिसांनी ेट्रक चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.









