डॉ. आंबेडकर ग्रंथ प्रकाशनासाठी ३ कोटींचा निधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे

index.jpeg 1
नागपूर  , दि. ९ (प्रतिनिधी) – उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रकाशनाचे काम सुरू झाले असून दहा ग्रंथ ‘रिप्रिंट’ साठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. याबाबत प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्न विचारला होता.‘या कामासाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी २२ लाख खर्च करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १९ लाख रुपये खर्च झाले असून त्याद्वारे काम सुरू आहे असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत विरोधकांनी दुष्काळाच्या विषयावर गदारोळ सुरु केला असतानाच या गदारोळामध्ये प्रश्नोत्तरे पुकारण्यात आली, पण यावेळी गदारोळ सुरु राहिल्यामुळे प्रश्नोत्तराचा तास उरकला गेला, त्यानंतर तावडे यांनी सभागृह तहकूब झाल्यानंतर विधान परिषदेत पटलावर ठेवण्यात आलेल्या प्रश्नांसदर्भात पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी सांगितले की,काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात निधी असूनही तो पुरेसा वापरण्यात येत नव्हता.त्यावेळच्या समितीने यासाठी पाठपुरावा करायला हवा होता. मात्र माजी मंत्री राजेश टोपेंच्या नेतृत्वाखालील जोगेंद्र कवाडे, नितीन राऊत, जनार्दन चांदूरकर यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. मात्र विरोधकांच्या खूर्चीवर बसण्याची वेळ आल्यानंतर मात्र त्यांनी हा निधी मिळत नसल्याची तक्रार केली, हा अजब प्रकार म्हणायला हवा, असा टोलाही तावडे यांनी विधान भवनाच्या दालनात पत्रकारांशी बोलताना मारला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रकाशन समितीचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणेदेखील सरकारच्या विचाराधिन आहे’, असे विनोद तावडे यांनी उत्तरात सांगितले.
अंजिठा लेण्याच्या संवर्धनात खंड पडणार नाही
औरंगाबादची जग प्रसिध्द अजिंठा लेण्याची  पावसामुळे दुरावस्था हेात असली तरी केंद्र सरकारच्या वतीने व अमेरिकन कंपनीच्या मदतीने हानी टाळण्यासाठी उपायोजना केल्या जात असून संवर्धनात खंड पडणार नाही, अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत मंगळवारी  दिली.
सुनील तटकरे, धनंजय मुंडे इत्यादींनी  हा तारांकित प्रश्न उपसिथत केला होता. दुष्काळावरविरोधकांनी गोंधळ घातला असतानाही सभापतींनी प्रश्नोत्तरांच्या तासाची घोषणा केल्याने ते पटलावर आले. पावसाने अजिंठा लेण्याच्या डोंगरमाथ्याची  माती भूसभूशीत होत आहे. मात्र दगडकाम मजबूत राहण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळ, आरंगाबाद यांच्याकडून लेण्यांचे संवर्धन केले जात आहे. यासाठी अमेरिकन कंपनीचीही मदत घेतली जाते. या कंपनीकडून दर तीन वर्षांनी लेण्यांची पाहणी करून त्यानुसार दुरूस्ती करण्यात येत आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.

व्यवस्थापनच्या प्रवेश प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणार
राज्यात असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्यामधून दिल्या जाणा-या प्रवेशात पारदर्शकता असली पाहिजे आणि गुणवत्तेच्या आधारावरच प्रवेश दिले गेले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी केले.
अभियात्रिकी महाविद्यालयात अल्पसंख्याक कोट्यातून होणा-या प्रवेशात गैरव्यवहार आणि अनियमितता होती.त्यामुळे या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अल्पसंख्याक कोटयातून भरल्या जाणा-या ५० टक्के जागा गुणवत्तेच्या आधारावरच भरल्या गेल्या पाहिजेत. नवी मुंबईतील फादर अँग्नेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या प्रवेश पध्दतीचा राज्यात अवलंब करण्याबाबचा प्रश्न नरेंद्र पाटील, धनंजय मुंडे, संदिप बाजोरिया आदी सदस्यांनी उपस्थित केला होता.

अकोला रूग्णालय शस्त्र क्रिया विभाग दुरूस्तीसाठी बंद
अकोला रूग्णालय शस्त्रिक्रया  विभाग दुरूस्तीसाठी सध्या बंदं आहे. मात्र शस्त्रक्रिया बंद झालेल्या नाहीत. अस्थिव्यंग शस्त्रक्रियागृहात शल्यशस्त्र  विभाग सुरू करण्यात आला असून तेथे शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.गोपी किशन बाजोरिया यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभाग बंद असून शस्र क्रियांसाठी दोन तीन महिन्यांच्या तारखा देण्यात येत असल्याचे बाजोरियांनी  नमूद केले होते. मात्र मुख्य शस्र क्रियांसह किरकोळ शस्र क्रियांकडेदुर्लक्ष झालेले नाही. यामुळे संबंधितांवर कारवाईचा प्रश्नच येत नाही. इमारतीचे बांधकाम  पूर्ण होताच नेहमीप्रमाणे शस्त्र क्रिया विभाग सुरू होईल, असे तावडे यांनी सांगितले.

तालुका क्रीडा संकुलाचा विषय प्राधान्यावर
‘राज्यात ३८० तालुका क्रीडा संकुले उभारण्याचे काम २००३ पासून सुरू आहे. यापैकी ६५ क्रीडा संकुलांना मार्च २०१४ अखेर निधी वितरीत झाला आहे. तर १७ संकुलांच्या अंदाजपत्रक आराखड्यांना राज्य क्रीडा विकास समितीची मान्यता मिळाली आहे. ३३ संकुलांचे अंदाजपत्रक आराखडे संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित १०४ क्रीडा संकुलांसाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, अशी माहिती क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित व धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 × = nine