डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमीपूजन १४ एप्रिलला

fadanvis-cht
मुंबई दि. ६ (विशेष प्रतिनिधी) -भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमीपूजन येत्या १४ एप्रिलला करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे हे स्मारक उभारणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ५८ व्या महापरिवनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, रिपाइं नेते रामदास आठवले आणि मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनी देखील महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर हजेरी लावली. राज्यातून लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात पोहोचलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three + 3 =