…तर मराठी चित्रपट मोठा होईल – अभिनेत्री मृणाल कुळकर्णी

_DSC0621
यवतमाळ (दि. १३ मार्च) – कोणतेही कथानक, सामाजिक संदेश नसताना अनेक हिंदी चित्रपट हिट होतात. मात्र चांगल्या कथानक असलेले मराठी चित्रपट हिट होत न होता पडतात. प्रेक्षकांनी ठरविले तरच मराठी चित्रपट मोठा होऊ शकतो असे, मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘विंग्ज’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी यवतमाळात आल्या असता, त्या पत्रकार परिषदेत बोलत
होत्या. मी कथा लिहिलेला ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’हा पहिला चित्रपट तर ‘राजा की आयेगी बारात’ हा नकारात्मक भूमिका असलेला एकमेव चित्रपट आहे. २२ हिंदी मालिकांत काम केल्याचे सांगून मराठी चित्रपट क्षेत्रातच पुष्कळ काम असल्याने हिंदी चित्रपट आणि मालिका यांना देण्यासाठी माझ्याकडे आता वेळ नसल्याचे त्या म्हणाल्या. खर्च परवडत नसल्याने मराठी चित्रपटाची जाहिरात हिंदीच्या तुलनेत नगण्य आहे. मराठीत चांगल्या कथा असल्यानेच गेल्या पाच वर्षांत तीन चित्रपट आॅस्करसाठी गेल्याचे सांगून आज मराठी चित्रपट तयार करताना कोणत्या विषयावर आणि कोणत्या वर्गावर बनवायचा, हा मोठा प्रश्न पडत असल्याची चिंता व्यक्त केली. मराठी चित्रपट चालावे यासाठी शासनाने प्रत्येक सिनेमागृहात एक शो प्राईम टाईममध्ये दाखवावा, अशी मागणी यावेळी कुळकर्णी यांनी केली.यावेळी पत्रकार परिषदेला जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव शीतल वातीले उपस्थित होते़.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 + one =