
यवतमाळ, दि. १५ (प्रतिनिधी) – शेतकºयांच्या मालाला हमीभाव देण्याबाबत सातत्याने उदासीनता बाळगणारा कृषीमूल्य आयोग रद्द करण्यात यावा, यामागणीसाठी तळेगाव (भारी) महामार्गावर शेतकºयांनी १ तास रस्तारोको आंदोलन केले. यामुळे यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
कृषीमूल्य आयोग आकस बुद्धीने शेतकºयांच्या मालाला हमीभाव देत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात २५ ते ३० गावातील शेतकरी सहभागी झाले होते. शेतकºयांना अशोक भुतडा, दत्ता चांदुरे, मोरेश्वर आदमणे, परशराम पारधी, सुभाष पातालबंशी यांनी मार्गदर्शन केले. कृषी पंपाची वीज जोडणी देण्यात यावी, कापूस व सोयाबीनच्या भावात वाढ करावी, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. रस्तारोको आंदोलनात आनंदा नागपूरे, महिपाल प्रधान, अरुण यादव, संदीप गोधने, मोहन ढोरे, मूलराज सोमवंशी, गणपत काकडे, प्रदीप लांडगे, ब्रिजेश शुक्ला, मोतीराम गावंडे, रामकिसन काकाणी, सदाशिव देशपांडे, नितीन मोरघडे, गोविंद राठोड, सुरेश डुकरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनुचित घटना घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









