तिळगुळ घ्या व प्रत्येक घरात शौचालय बांधा – खा.भावना गवळी

2
यवतमाळ, दि. १९ : स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने गावागावात स्वच्छ भारत मकरसंक्रांत सप्ताह राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सावरगड येथे आयोजित
कार्यक्रमास खा.भावनाताई गवळी यांनी सहभागी होवून तिळगुळ घ्या व प्रत्येक घरात शौचालय बांधा अशा शब्दात गावकऱ्यांना शौचालय बांधण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी श्री.ईश्वरकर, सरपंच सुहाष सरगर, प्रा.मोहनिष सवाई, प्रा.ओमी चांडक आदी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे सावरगड येथे शिबीर सुरु असून त्या शिबीरात मकरसंक्रांतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात खा.गवळी सहभागी झाल्या होत्या. जिल्हा परिषदेच्यावतीने मोठ्याप्रमाणावर शौचालय बांधकामाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्यावतीने यासाठी पात्र कुटुंबाना 12 हजार रुपये शौचालय बांधकामासाठी अनुदान दिल्या जाते. त्याचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा व अधिकाधिक शौचालय बांधावे, असे आवाहन खा.गवळी यांनी केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.कलशेट्टी यांनी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त करून संपुर्ण गाव निर्मल ग्राम करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. प्रत्येकाने स्वच्छतेचा भ्यास घेतला पाहिजे. शासन यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचलन गजानन परसोडकर यांनी केले तर आभार प्रविण दळणे यांनी मानले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four − 4 =