तीन मुलांना टाकून मातेचे पलायन, पोलीस स्टेशन समोर घटना

images.jpeg 0
यवतमाळ , दि. १७ – तीन मुलांना वाºयावर सोडून मातेने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार आज बुधवारी पुसद शहर पोलिस ठाण्यापुढे उघडकीस आला. ही बाब लक्षात येताच ठाणेदार व पोलीस कर्मचाºयांनी या तीनही मुलांना मायेची उब दाखवत न्यायालयात हजर करण्यापूर्वी महिला पोलिस शिपायाच्या अधिनस्त देखरेखीत ठेऊन मानवतेचा धर्म पाळला. या घटनेने शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
पुसद येथील तुकारामबापू वॉर्डातील अनुसया रमेश आडे या मातेचे हे कृत्य आहे. दोन दिवसांपूर्वी या महिलेने ६ वर्षाची एक मुलगी, ४ वर्षाचा आणि दिड वर्षाचा असे दोन मुले चक्क पुसद शहर पोलिस ठाण्यापुढे बेवारस टाकून पलायन केले. ९ महिन्यानंतर अत्यंत कष्टप्रद परिस्थितीत जन्मलेली ही बालके चक्क आईनेच उघड्यावर टाकली. पुसद शहर पोलिस ठाण्यापुढे तीनही पोटच्या गोळ्यांना वाºयावर सोडून मातेने पलायन केले. अन्न, निवारा आणि थंडीचा प्रकोप यामुळे मेटाकुटीस येवून रडवेल्या स्वरात मातेसाठी झिंगलेली ही कोमल बालके पुसद शहर ठाणेदाराच्या दृष्टीस पडली. त्यांनी तात्काळ संबधित कर्मचाºयांना पाठवून या तीनही भावंडांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्यासह थंडीपासून बचाव होण्याकरीता कपडेलत्ते घेतले. सध्या ही तीनही चिमुरडी पुसद शहर पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस शिपायाच्या देखरेखीत आहेत. यांच्या मातेने या तीनही मुलांना वाºयावर सोडून पलायन का केले  हे अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु  ‘खाकी’ ने या तीनही भावंडांना मायेची उब देवून दोन दिवसांपासून जोपासले. उद्या १८ रोजी या तीनही भावंडांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे मातेपासून दुरावलेल्या या तीनही भावंडांची बालसुधारगृहात रवानगी होण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × = fifty four