
यवतमाळ – जिल्ह्यात चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आज दुपारी दारव्हा व दिग्रस तालुक्यात जोरदार गारपिठ झाली. यामध्ये शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहे.
दिग्रस तालुक्यात आज दुपारी अचानक वादळी वाºयासह गारपिठ झाली. यामध्ये विटाळा, वसंतनगर, विठोली (मा.), चिचपातर, तुपटाकळी, डेहणीसह परिसरातील गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.तसेच दारव्हा तालुक्यातही गारपिठ झाली. त्यामुळे शेतातील गहु, हरबरा, संत्रा, पालेभाज्याचे मोेठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.









