
यवतमाळ, दि. २३ – मागील सात दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह आज सकाळच्या सुमारास नदीत तरंगताना दिसून आल्याने खळबळ उडाली. हर्षाली अंबादास ढेंगाळे (१८), असे मृत युवतीचे नाव असून, माणूसमाºया पुलाने घेतलेला ३१ वा बळी आहे.
हर्षाली ही सात दिवसापासून बेपत्ता होती. या प्रकरणाची तक्रार तिच्या आईने दिग्रस पोलीस ठाण्यात नोंदविली होती. आज धावंडा व मोरणा नदीच्या संगमस्थळी एका युवतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत काही नागरिकांच्या दृष्टीपथास पडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळ धाव घेतली होती. हर्षालीचे नातेवाईक संभाजीनगर येथून मृतदेह बघण्यासाठी आले. त्यांनी मृतदेह हर्षालीचा असल्याचे सांगितले. मागील महिन्यात संभाजीनगर येथील इश्वर चौधरी या युवकाचा मृतदेह याच ठिकाणी तरंगत असताना आढळून आला होता. नदीपात्रात शेवाळ व जलपर्णी वाढल्याने मृतदेह उशीरापर्यंत कुजलेल्या अवस्थेत पडून राहत आहे. मृत युवतीने आत्महत्या केली की घातपात आहे, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळू शकेल, असे पोलीस सूत्राने सांगितले. शनिमंदीर ते मल्लिकार्जुन मंदीराला जोडणाºया पुलाखाली आतापर्यंत ३१ जणांचे मृतदेह आढळून आल्याने या पुलाचे नामकरण आता माणूसमाºया पूल असे झाले आहे.









