नेर (यवतमाळ) – दुबार पेरणीही वाया गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील शेतकºयांने जीवनयात्रा संपविल्याची घटना आज रविवारी घडली. वासुदेव आत्माराम नेवारे (५५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
गेल्या दिड महिन्यात पावसाने मोजून चार ते पाच वेळाच हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकºयांची पीके करपल्या गेली. दुबार, तिबार पेरणी करूनही पावसाचा पत्ताच नसल्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावल्या गेले आहे. ब्राम्हणवाडा येथील नेवारे या शेतकºयाने सुरूवातीला पेरणी केल्यावर पाउस न आल्याने बियाणे उगवलेच नाही. दुबार पेरणीसाठी मांगलादेवी येथील युनियन बँकेकडे कर्जासाठी प्रकरण दाखल केले. त्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने बँकेने कर्ज नाकारले.कर्ज नद मिळाल्याने दुबार पेरणी कशी करावी अशी चिंता शेतकºयाला सतावत होती. या विवंचनेत आज नेवारे यांनी हनुमान टेकडी जवळ सुरू असलेल्या बांधकामातील गजाला गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नी, २ मुले व १ मुलगी असा आप्तपरीवार असून, शासनाने मृतकाच्या कुटूबिंयाना मदत करावी अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनिल घावडे यांनी केली आहे.










