
पणजी – एरनाकुलम दुरांतो एक्सप्रेसचे १० डबे आज रुळावरून घसरले. बाली रेल्व स्टेशनजवळील बोगद्यात हा अपघात झाला. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पणजीच्या दक्षिणेला ४५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही. घटनास्थळी रुग्णवाहिकेसह वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली आहे. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटे यांनी ही माहिती दिली आहे.









