दुहेरी आकड्यात जागा द्या – खा. रामदास आठवले

images3-3
मुंबई – भाजप शिवसेना महायुती आणखी मजबूत होऊन ती कायमस्वरूपी टिकली पाहिजे. महायुती टिकविण्याची जबाबदारी केवळ आमचीच नसून, ती सर्वांची आहे. दोन मोठ्या पक्षांनी सन्मानाने महायुतीच्या लहान घटकांना विधानसभेचे जादा मतदारसंघ सोडले पाहिजेत. आम्हांला दुहेरी आकड्यात जागा मिळायला हव्यात. पाच सहा जागांवर चालणार नाही अन्यथा पक्ष वेगळा विचार करील असा इशारा रि​पब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा बुधवारी मुंबईत दिला.
आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणीची बैठक चेंबूरमध्ये झाली. या बैठकीत काही राजकीय ठराव संमत करण्यात आले. त्यात पक्षाने हमखास निवडून येतील अशा १५ मतदारसंघाची मागणी महायुतीकडे केली आहे. किमान १० मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत मिळायला हवेत. रिपब्लिकन पक्षाचेच उमेदवार पराभूत होत नाहीत तर शिवसेना भाजपचेही निम्मे उमेदवार पराभूत झाल्याचे याआधीच्या निकालांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे चांगले मतदारसंघ द्या. एकदिलाने काम केल्यास काँग्रेस आघाडीचा पराभव अटळ असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six × 3 =