दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या तोडगा नव्हे – संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव

IMG_20150117_142024
जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेला सुरूवात
उमरखेड (यवतमाळ), दि. १७ – देशाचा पोशिंदा शेतकरी सध्या नैसर्गिक दृष्ट चक्राच्या सावटात अडकला आहे. ज्या बाजूने फिरकुन पाहतो तर दररोज आत्महत्या होत असल्याच्या बातम्या ठळक बघाव्यास मिळतात.या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्याचाच स्विकार करणे म्हणजे जिवनातील चढउताराचा तोडगा नव्हे असे प्रतिपादन साहित्यीक इंद्रजित भालेराव यांनी केले.
कै. विठ्ठलराव पाटील (देवसरकर) साहित्य नगरी स्थानिक माहेश्वरी खुले नाट्यगृह ह्या ठिकाणी ग्रामीण भागातील पहिले १० वे मराठा सेवा संघ प्रणित, जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे आयोजन १६ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान केले आहे. या संमेजनाच्या उद्घाटन प्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन प्रा. शेषराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर संमेलनाध्यक्ष लोककवि इंद्रजित भालेराव तर स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार प्रकाश पाटील हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलतांना भालेराव म्हणाले की, शेतकरी जीवनचरित्र्यावर ५०० च्या वर कविता लिहील्या आहे. ईयत्ता पहिली ते बारावीमध्ये सहा पुस्तकात माझ्या कविता आहे. पुस्तके बदलण्यात आली पण कविता नाही. साहित्य परिषदेची सुरूवात डॉ. एस.एस. भोसले यांनी केली. विदर्भ कन्या तिन पिढ्याच्या स्त्री एकमेव वारसदार मॉ जिजाऊ यांचा जिवनपट कवितातून मांडला होतो असे ते म्हणाले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, डॉ. निर्मला पाटील, नगराध्यक्षा उषा आलट, माजी आमदार विजय खडसे, जिल्हाध्यक्ष दिलीप महाल्ले, माजी बांधकाम सभापती तातू देशमुख, बाबा भांड, डॉ. अशोक राणा, सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, संमेलन कार्याध्यक्ष प्रा. प्र. भा. काळे, कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, पप्पू भोयर पाटील उपस्थित होते. संमेलनाचे प्रास्ताविक डॉ. प्र. आर. काळे यांनी केले. यावेळी विदर्भ, मराठवाड्यातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× four = 36