
यवतमाळ, – देशातील गरीब जनता, शेतकरी आणि महिलांना शाश्वत अधिकार देऊन आम्हाला व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणायचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्टÑीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
यवतमाळ-वाशीमचे उमेदवार शिवाजीराव मोघे, चंद्रपूर-आर्णी संजय देवतळे व हिंगोलीचे राजीव सातव यांच्या प्रचारार्थ पोस्टल मैदानात आयोजीत सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्टÑाचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, उमेदवार शिवाजीराव मोघे, संजय देवतळे राष्टÑवादीचे आ. संदीप बाजोरीया, जोगेंद्र कवाडे आदी मंचावर उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा असल्याने ती मिटवायला निघालेलच मिटून जातील.ज्या गुजरात मॉडेलचा उदोउदो केला जात आहे, त्यापेक्षा महाराष्टÑ राज्य सर्वच बाबतीत कितीतरी पटीने आघाडीवर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदींनी भाजपाची सत्ता असलेल्या राज्याचा विकासदर बघावा आणि आत्मपरीक्षण करावे असे ते म्हणाले. देशातील शेतकºयांना ७० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्टÑाला त्यातील चार हजार कोटी नुकतेच मंजूर करण्यात आले. मात्र मोदी ज्या गुजरातची गोष्ट करतात, तेथील शेतकºयांची तब्बल तीन हजार एकर जमीन टाटांच्या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली. त्याचा मोबदलाही अनेक शेतकºयांना मिळाला नाही. काँग्रेसचे सरकार केंद्रात सत्तेत आल्यास जाहिरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे नागरिकांना आरोग्याचा अधिकार, पेन्शनचा अधिकार लागू केला जाईल असे ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दोन्ही राज्यांच्या तुलनात्मक विकासदराबाबतच समोरासमोर खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले. प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी देशात पुन्हा काँग्रेसच सत्तेवर येईल आणि महाराष्टÑात काँग्रेस आघाडीला किमान ३० ते ३५ जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. पिरीपाचे जोगेंद्र कवाडे यांनी नरेंद्र मोंदीवर हल्लाबोल करून, गुजरातमध्ये माणुसकीला काळीमा फासणारे देशात सत्तेत आल्यास भारत उध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त केली. कार्यक्रमाचे निवेदन आ. वसंत पुरके यांनी केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









