
नवी दिल्ली – देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के असला तरी २००१-२०११ या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे.
गेल्या दशकातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मिळालेल्या या अहवालातील ताज्या आकडेवारीनुसार, मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर आजही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. मात्र, नव्वदच्या दशकातील आकडेवारीशी तुलना केल्यास मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्क्यांनी घसरला आहे. १९९१-२००१ या काळात मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर २९ टक्के होता. तो आता २४ टक्क्यांवर आला आहे.









