यवतमाळ – आजपर्यंत देशाला लुटणाºयांना त्यांची खरी जागा दाखवून देत शेतकºयांच्या गळ््याभोवती फास आवळणाºया काँग्रेसला फासावर लटकवा, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांनी केले. शिवसेना, भाजप, रिपार्इं(आ.) महायुतीच्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ पोस्टल मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.
यवतमाळ-वाशीमच्या उमेदवार भावना गवळी, चंद्रपूरचे हंसराज अहीर यांच्यासह विदर्भातील सर्वच ठिकाणच्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील शेतकरी सुल्तानी संकटात असताना त्यांच्यावर अस्मानी संकटही कोसळले असून पण सरकारने शेतकºयांच्या या परिस्थितीचेही राजकीय भांडवल केले, असा आरोप त्यांनी केला. केंद्रात एनडीएचे सरकार सत्तेत आल्यास शेतकºयांना कर्जमुक्ती देऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराने शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळींसोबत एकाच व्यासपीठावर आमने-सामने चर्चा करावी, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. शेतकरी जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी आमच्या व्यासपीठावर आल्याचे समाधान आणि आनंद आहे, असे सांगून शेतकºयांनो धीर धरा, आत्महत्या करून कुटुंबाची परवड करू नका, असे आवाहन केले. सत्तेत आल्यानंतर शेतकºयांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू, अशी ग्वाही देत जिल्ह्यातील सिंचनाची समस्या, रेल्वे मार्ग, औद्योगीकरण आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासनही ठाकरे यांनी दिले. यावेळी यवतमाळ- वाशिम लोकासभेच्या उमेदवार भावना गवळी बोलतांना म्हणाल्या की, पुढील पाच वर्षात रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेवून, टेक्सटाईल पार्क, शेतमलावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना नेते आ. सुभाष देसाई, डॉ. विकास महात्मे, माजी न्या. अशोक खिल्लारे, नामदेव खोब्रागडे, किशोर तिवारी, राजेंद्र डांगे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते माजी आ. गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. संजय राठोड, माजी आ. बाळासाहेब मुनगीनवार, विश्वास नांदेकर, मदन येरावार, दिवाकर पांडे, संदीप धुर्वे, प्रवीण पांडे, सोमेश्वर पुसतकर, सुधाकर तायडे, महेंद्र मानकर, सुधीर कंवर, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.










