
आर्णी, दि. १३ – शहरात सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर धाड टाकून दोन मुलींसह एका जणाला अटक केली. ही कारवाई यवतमाळ येथील एलसीबीच्या पथकाने आज दुपारी ३.३० वाजता दरम्यान बसस्थानक परिसरात केली.
नगर परिषदेच्या मागील परिसरात मागील काही वर्षापासून देहविक्रय अड्डा सुरू आहे. याबद्दल स्थानिक पोलिसांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. अल्पवयीन मुलींना या देहविक्रय अड्ड्यावर आणून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतल्या जातो. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. यावेळी दोन मुलींसह मालक सुनिल वामनराव गायकवाड रा. गांधीनगर याला अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे देहविक्रय अड्डा चालविणारा व्यक्ती दुसराच असून कारवाईची गंभीरता कमी करण्यासाठी दुसºयाच व्यक्तीला मालक म्हणून समोर करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मुख्यसूत्रधार हाती लागू शकले, अशी चर्चा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, चंद्रशेखर कडू, गजानन अजमिरे, रुषी ठाकूर, आशीष भुसारी, किरण पडघण, अमोल चौधरी, अर्चना मेश्राम आदींनी केली.
प्रेमनगरात रात्री उशीरापर्यंत देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याने १८ महिलांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. न्यायालयासमोर हजर केले असता जामिन मंजूर करण्यात आला. या कारवाईमुळे देहविक्रय अड्डा चालविणाºया मालकांचे धाबे दणाणले आहे.









