दोन दहशतवाद्यांना अटक

अयोध्या – उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने (अँटी टेररिस्ट स्क्वाड) अयोध्येजवळ गोरखपूर स्टेशनवरुन बरकत आणि मुझममिल या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी मानवी बॉम्ब होण्याच्या उद्देशाने आले असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा आणि बॉम्ब निर्मितीचे बरेच साहित्य जप्त करण्यात आले.
दहशतवादी तहसीन अख्तर याच्या चौकशी दरम्यान दिल्ली पोलिसांना मानवी बॉम्ब बनण्यासाठी आलेल्यांची माहिती मिळाली. ही माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सापळा रचून कारवाई केल्याचे एटीएसचे पोलिस महानिरीक्षक राजीव सभरवाल यांनी सांगितले. पकडलेले दोन्ही दहशतवादी पाकमधील मुलतानचे रहिवासी आहेत, असेही ते म्हणाले. याआधी दिल्ली आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राजस्थानमधून इंडियन मुजाहिदीनच्या सहा जणांना पकडले. यात बॉम्ब तयार करणारा पाकिस्तानी दहशतवादी वकास हा देखिल होता. हे दहशतवादी देखिल मोदींनाच मारण्याच्या उद्देशाने सक्रिय झाले होते. आठवड्याभरात मोदींना लक्ष्य करण्यासाठी सक्रिय झालेल्या आठजणांना पकडल्यामुळे मोदींच्या सुरक्षा यंत्रणेला विशेष खबरदारी घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 8 = ten