
यवतमाळ – वन जमिनीवरील पराटी काढल्याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी लाच लाच मागणाºया दोन वनरक्षकांना अटक केली. आज गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुकुटबन येथील शासकीय निवासस्थानी ही कारवाही केली. संदिप शालीक साखरकर (२७), संदिप रमेश पारधी (२६) अशी अटक केलेल्या वनरक्षकांची नावे असून ते मुकुटबन येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालात कार्यरत होते.
बालाजी देवराव नांदेकर (३९) रा. हेटी ता. कोरपना जि. चंद्रपुर यानी २४ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. वनविभागाची परवानगी न घेता वनजमिनीवरील पराटी ट्रॅक्टरने काढल्याने ट्रॅक्टर जप्त करुन दंड करतो अशी भिती दाखवून दाखविली. कायदेशिर कारवाई टाळायची असेल तर १० हजार लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमुद केले. त्यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ मार्च रोजी पडताळणी केली. यामध्ये पंचासमक्ष दोन्ही वनरक्षकांनी कायदेशिर कारवाई टाळण्यासाठी १० हजार लाचेची मागणी केली होती. दरम्यान आज २७ मार्च रोजी वनरक्षकांच्या शासकीय निवासस्थानीच अटक केली. ही कामगिरी पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीचे पोलीस उपअधिक्षक उत्तम जाधव, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, सुधाकर कोकेवार, गजानन राठोड, अमोल महल्ले,शैलेश ढोणे, अमित जोशी, निलेश पखाले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार , किरण खेडकर यांनी पार पाडली.









