‘धम्मदिक्षा’ नाट्यकृतातून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ विचारसुत्र

42
यवतमाळ – आयुष्याच्या संध्याकाळी आम्हाला सोडून जाऊ नकोस ही मनविभोर करणारी राजा शुध्दोधन महाप्रजापती यांची आर्त हाक, विनवणी आणि दु:खमुक्तीसाठी डोक्यात मी चंद्र जखमी घेऊन मी निघाली’ या ठाम निग्रह या संबोधी क्रिएशन निर्मित धम्मदिक्षा नाटकाच्या पहिल्याच प्रदेशातील गृहत्यागाच्या भाव नाट्यास नाट्यरसिंकांनी भरभरून दाद दिली. ९ मे रोजी समता पर्वात सादर झालेल्या प्रा. शांतरक्षित गावंडे लिखीत व अविश वत्सल बन्सोड दिग्दर्शित धम्मदिक्षा नाट्यकृतीच्या सादरीकरण केले.
प्रारंभी जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नाट्यदिग्दर्शक अविश वत्सल बन्सोड यांचे स्मृतीदिन्ह देऊन स्वागत केले. बुध्द आणि त्यांचा धम्म या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथातील बहुजन हिताय बहुजन सुखाय हे विचारसुत्र घेऊन ही नाट्यकृती आकारास आली. सिध्दार्थाचा गृहत्याग, सुजाताचे खरिदान, चांडलिका प्रकृतीची धम्मदिक्षा, अंगुलीमालाचे मत परिवर्तन, दुराचारी लोकात धम्मदिनेने केलेले परिवर्तन, मृत्यू हे अंतीम सत्य आहे. हे किसा गौतमीलात बुध्दांना सांगितलेले जीवनसत्य, हे सर्व प्रसंग रंगमंचावर सरसपणे सादर झाले. रंजन आणि प्रबोधन यांचाही सुरेख समन्वय साधण्यात आला. या नाट्याकृतीत महाप्रजापती, मातंगी, गुरूमाता ह्या व्यक्तीरेखा (चारुलता पावशेकर), प्रकृती किसा गौतमी (कांचन गुजर), सुजाता (स्फुर्ती गोळे, धम्मदिना (भारती कुडमेथे), सखी (प्रशंसा पाटणकर), अचार्व (विजय रंगारी), वाणिक (राजेश (श्रीवास्तव), धनिक (सुरज मोने), माणिक (स्वप्नील मिसळे), तथागत बुध्द (सुनिल आडे), राजा शुध्दोधन (गौतम बोरकर), अंगुलीमाल (संजय माटे), रजपुत्र सिध्दार्थ (ज्ञानेश्वर सोनटक्के), अहिसंक (राहुल गेडाम), बाल सिध्दार्थ (ऋषिकेश चौधरी), देवदत्त (रोशन चौधरी), निवेदक भदंत (अतुल मेश्राम), भदंत (गुलशन पाटील, निखील भगत) या सर्व कलावंतानी आपल्या भुमिका प्रभावीपणे साकारल्या सुबोध वाळके यांच्या पार्श्वसंगित आणि संगित संयोजनाचे अनेक प्रसंगात घनव्याकुळ केले. चेतन बालपांडे यांच्या गायनाने संगित नाट्याची आठवण करून दिली. अशोक कार्लेकर यांची प्रकाश योजना, प्रसंगानुसार व प्रत्ययकारी होती. समारोपीय कार्यक्रमात डॉ.टि.सी. राठोड यांनी मनोगत व्यक्त करतांना ‘धम्मदीक्षा’ही नाट्यकृती अव्वल दर्जाची असल्याचे मत व्यक्त केले. समता पर्वाचे सुत्रधार कुलदिप रामटेके, डॉ. टि.सी. राठोड, समता पर्वाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. सुनंदा वालदे, मंगला दिघाडे, शिक्षधाधिकारी गंगाधर जाधव, धांदे यांच्या हस्ते कलावंताचे स्वागत केले.संचालन सुनील वासनिक, नम्रता खडसे यांनी तर आभार तिजेंद्र ढाणके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight + = 9