नक्षलग्रस्त भागात पहिल्या टप्प्यातच मतदान घ्या

नवी दिल्ली- देशातील ३३ नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान घेण्याची विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांमध्ये केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशातील नक्षलग्रस्त भागात पहिल्या टप्प्यात मतदाना घेतल्यास अधिक सुरक्षा देता येईल तसेच हिंसाचाराच्या घटना टाळता येतील असे गृहमंत्रालयाचे मत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान हिंसाचार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळेच हिंसक घटना टाळण्यासाठी गृहमंत्रालयाने ही सूचना केली आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयाने झारखंड, छत्तीसगड, बिहार, ओदिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील ३३ जिल्ह्यातील निवडणुकीच्या काळातील हिंसाचाराच्या घटनांची आकडेवारी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. गृहमंत्रालयाने लोकसभा निवडणूक २००४, २००९ आणि विधानसभा निवडणूक २००८, २००९, २०१० आणि २०१३ या वर्षातील आकडेवारी सादर केली आहे.याशिवाय २०१३मध्ये झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी ३८३ हल्ले केले आहेत. त्यात १५० नागरीक आणि सुरक्षा जवान ठार झाले आहेत. अशाच प्रकारच्या ३५३ घटना छत्तीसगडमध्ये झाल्या असून त्यात ११० जणांचा मृत्यू झाला आहे.बिहारमध्ये नक्षलवाद्यांकडून हिंसाचाराच्या १७६ घटनांमध्ये ६९, ओदिशामधील १०१ घटनांमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. गृहमंत्रालयाने झारखंडमधील १३, छत्तीसगडमधील आठ, बिहार आणि ओदिशामधील प्रत्येकी चार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मतदान घेण्याची सूचना केली आहे.तर महाराष्ट्रातील गडचिरोली आणि मध्य प्रदेशमधील दोन जिल्ह्यांचा यात समावेश आहे. एप्रिल-मे महिन्यात होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल एक कोटी २० लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 6 = thirteen