नवीन क्रीडा धोरणामुळे क्रीडा विकासाला चालना

dfdf
छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा
यवतमाळ : राज्याच्या नवीन क्रीडा धोरणामुळे विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात राज्‍य आघाडीवर आहे. या क्रीडा स्पर्धाद्वारे ग्रामीण भागातील खेळाडुंना उत्तेजन दिल्या जात असल्यामुळे क्रीडा विकासाला चालना मिळू लागली आहे. असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी यांनी केले.
राळेगांव येथे स्व. राजीव गांधी तालुका क्रीडा संकुलच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी क्रीडा मंत्री वळवी बोलत होते. विधान परिषरदचे सदस्य माणिकराव ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके, खासदार भावना गवळी, जि.प. अध्यक्ष प्रवीण देशमुख, पं.स. सभापती अशोक केवटे, उपसभापती नलीनी पराते, जि.प. सदस्या सीमा तेलंगे, नरेंद्र ठाकरे विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, प्र. जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, विजय संतान आदि मान्यवर व्यासपीठावर होते. विविध क्रीडा स्पर्धा तसेच व्यायाम शाळांच्या अनुदानात वाढ करण्यात येत आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना परीक्षेत क्रीडा गुण देण्याची तसेच शासकीय नौकरीसाठी आरक्षणाद्वारे प्राधान्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलम्पीक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला राज्य शासनाकडून एक कोटी रुपयाचे बक्षीस व त्या खेळाडुच्या क्रीडा मार्गदर्शकाला त्या पुरस्कार रकमेच्या 25 टक्के रक्कम दिली जाते अशी माहितीही पद्माकर वळवी यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर दीप व क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन क्रीडा मंत्र्यांनी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. आंतरराष्ट्रीय खेळात महाराष्ट्र पुढे येत आहे. क्रिकेट सोबतच देशी खेळाचे महत्व वाढविण्यासाठी चांगले प्रयत्न झाले पाहिजे असे विचार सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले.खेळ हे जीवनाचं अविभाज्य अंग असून तणावमुक्तीसाठी खेळाचे अधिक महत्व आहे. या क्रीडा स्पर्धेद्वारे राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होते. असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील क्रीडांगणे सुसज्ज असावी तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित झाल्या पाहीजेत अशी अपेक्षा पुरके यांनी केले. खेळ हा व्यायामाचा प्रकार असून आरोग्यासाठी उत्तम आहे. परीक्षेसाठी क्रीडा गुण दिले जात असल्यामुळे मुलांना खेळाकडे प्रोत्साहित करण्याचा पालकांचा कल दिसून येतो ही चांगली बाब आहे असे मत खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात खेळाडुंना चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी जि.प. अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी याप्रसंगी केली.आमदार माणिकराव ठाकरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. विभागीय आयुक्त डी.आर बनसोड यांनीही आपले विचार मांडलेत. राज्यातील आठ विभागातील एकूण 32 चमू या व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. 18 व 21 वयोगटातील मुलमुली खेळण्यासाठी आले असून ह्या क्रीडा स्पर्धा 13 फेब्रुवारी पर्यंत या मैदानावर होत आहेत. विजेत्या चमूना सुमारे 17 लाख 60 हजाराची रोख बक्षीसे दिली जातील अशी माहिती क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे यांनी प्रास्ताविकात दिली.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधव काळे, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष अरविंद वाढोणकर, राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे प्रमोद धुर्वे, जलालुद्यिन गिलानी, उपविभागीय अधिकारी मोहन जोशी, भागवत डोईफोडे, तहसिलदार सुरेश कवडे, प्रतिष्ठीत नागरिक नरेंद्र जयसिंगकार, विवेक दौलतकार, पवन छोरीया, रमेश बोभाटे, विनोद उगेमुगे, सतीश डाखोरे यांचे सह खेळाडू उपस्थित होते.सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 − = six