हैदराबाद – घरातील नातेवाईकानेच तीन मुलींना पळवून त्यांना पेटवून दिल्याची क्रूर घटना आंध्र प्रदेशमधील निझामाबाद जिल्ह्यात घडली. गुरुवारी सकाळी निझामाबाद येथील एक कॉलेजजवळ या तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नरेंदर रेड्डी असे या आरोपीचे नाव असून त्याने बुधवारी रात्री त्याने सिरी(नऊ), अक्षया(सात) आणि खुशी(पाच) या तिघांना कारमधून पळवून नेले. त्यानंतर निझामाबाद शहराबाहेर या तिघींवर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.याआधी बुधवारी तिनही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या घरच्यांनी केली होती. यानंतर पोलिसांनी तपास केला असता या चिमुकल्यांचे मृतदेह निझामाबाद येथे आढळून आले. लग्न होत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यने हे कृत्य केले असावे असे समजते. पोलिस यासंबधी पुढील तपास करत आहेत.









