
मुंबई- बदललेल्या शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे अॅड. राहुल नार्वेकर यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नार्वोकर यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. तसेच त्यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आल्याचे घोषणा पवार यांनी केली.
त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नर्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीसाठीची उमेदवारी परस्पर माघीर घेतली नसल्याचे नार्वेकर यांनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उमेदारीमागे घेत असल्याची कल्पना पक्षप्रमुखांना असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीत घोडेबारा होऊ नये यासाठी उमेदवारी मागे घेतल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी प्रवेश करताना नार्वेकर यांनी शिवसेना नेतृत्वावर जोरदार टीका केली. पक्षात घुसमट होत असल्याने पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हाता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनसेवेची संधी मिळाल्याचे नार्वेकर म्हणाले. शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाचे आपण बळी ठरत होते. तसेच पक्ष नेतृत्वाकडून हवी तशी साथ मिळाली नसल्याचे ते म्हणालेे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचेे पुण्यातील सर्व उमेदवार २६ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.









