ना बिकने वाला समाज बनो – गरुड

DSC_0484
DSC_0480यवतमाळ – सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने संपूर्ण देशामध्ये वातावरण निर्मिती केली आहे. बसपाने मुस्लिम,ब्राम्हण, मराठा, दलित, आदिवासी, बंजारा आदी समाजाला तिकीट देऊन महाराष्टÑात ४८ लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवार उभे केले असून देशामध्ये पार्टी तिसºया क्रमांकाची ताकत म्हणून उभी झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा नसून सामाजिक असमानता हा प्रमुख मुद्दा आहे. त्याला बगल देऊन काँग्रेस -राकॉ, सेना-भाजपा समस्त बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून समाजाने ‘ ना बिकने वाला समाज बनो’ असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केले.
यवतमाळ – वाशीम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार बळीराम राठोड यांच्या प्रचारार्थ पाटीपुरा येथे आयोजीत सभेत ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आरक्षणाचा मुद्दा असो अथवा वेगळा विदर्भ राज्याचा मुद्दा असो हे दोन्ही एनडीए, युपीए एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन बहुजनवादी नितीचा विरोध करत असतात. कारण यांना कोलगेट, आदर्श, टेलीकॉम घोटाळ््यातून निवडणूक लढविण्याकरीता पैसा मिळत असतो. तसेच येथील उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेऊन इथल्या दलित शोषित समाजाचे अहित साधण्याचे काम ह्या पाटर्या करीत असतात.बहुजन समाज पार्टी ही समाजाच्या पैशाच्या भरवशावर निवडणूक लढवून सरकार बनविण्यावर इथल्या बहुजन समाजाचेच काम करणार नाही उद्योगपत्यांचे. जाती-जातीत वितुष्ट निर्माण करुन धर्माच्या नावावर मते मगण्याची व हिंदू, मुसलमान यांच्यात भांडणे लावून मुस्लिम काँग्रेस-राकाँकडे व हिंदू भाजप-शिवसेनेकडे वळविण्याचा प्रयत्न केला जातो. तर येथील बहुजन समाजाला विकासाच्या मुद्यापासून विभक्त केल्या जाते. बहुजन समाज पार्टीच्या मायावती ह्या जेव्हा उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री बनल्या तेव्हा त्यांनी हजारो एकर सरकारी जमिनीचे वाटप केले. तसेच ४०० स्क्वेअर फुटाचे घरकुल बांधून दिले. महाराष्टÑामध्ये मात्र शेती तर नाहीच परंतु रमाई घरकुल योजनेअंतर्गत फक्त ६८ हजार ५०० रुपये देऊन येथील दलितांची मतदान घेण्याचे काम काँग्रेस-राकॉ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मायावतींना पंतप्रधान बनविण्याकरीता आपणास बाबासाहेबांच्या हत्तीला संसदेमध्ये पाठवायचे आहे. यवतमाळ-वाशिम क्षेत्रातून उभे असलेले बळीराम राठोड यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बळीराम राठोड यांनी गेल्या ६५ वर्षातील बहुजनावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बंजारा सहित समस्त बहुजन समाजाने मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी खोरिपाचे उमेदवार सुधाकर घायवान, शिलानंद कांबळें यांनी बंजारा समाजासह काँग्रेस,राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× nine = 63