निम्न पैनगंगा’ च्या भुसंपादनात शासनाची फसवणूक , तीन अधिकाºयांसह शेतकºयारवर गुन्हे

e24bimg_203812_chimta_nended4t534_240x180-150x150
यवतमाळ – पर्यावरण व वनमंत्रालयाच्या एनओसीविना अधांतरी लटकलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भुसंपादनात प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता, आर्णीचे दूय्यम निबंधक व शेतकºयाने संगणमतातून शासनाला लाखोंचा चुना लावला आहे. याप्रकरणात धरण विरोधी संघर्ष समितीने आर्णी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालावरून संबधीतावर फसवणूकीचे गून्हे दाखल करण्यात आले आहे.
गोदावरी खोºयातील उपनदी असलेल्या निम्न पैनगंगा नदीवर सिंचन प्रकल्प उभारणीसाठी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपली सर्वशक्ती पणाला लावली आहे. मात्र या प्रकल्पाच्या बूडीत क्षेत्रात हजारो हेक्टर सोन्यासारखी सुपिक जमिन व अनेक गावे जात असल्याने त्याऐवजी विष्णूपुरी पध्दतीचे बंधारे बांधावे यासाठी धरण विरोधी संघर्ष समितीने आपला विरोध चालविला आहे. या विरोधाला न जूमानता शासनाच्या जलसंपदा खात्याने प्रकल्पासाठी भुसंपादनाचे काम हाती घेत आर्णी तालुक्यातील खडका येथील काही हेक्टर शेतींचे संपादनही केले. भुसंपादन करताना कोरडवाहू शेतीचे सातबारे बागायती दाखवून संपादनाचा भरमसाठ निधी काही शेतकºयांच्या संगणमतातून लाटण्यात आला आहे. अशाच प्रकारे खडका येथील शेतकरी दत्तात्रय लिंगावार यांचेकडील ४ हेक्टर २ आर शेती २५ संप्टेबर २००९ रोजी संपादीत करण्यात आली. संपादनाची प्रक्रिया तत्कालीन निम्न पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुधाकर बोरसे, आर्णीचे उपअभियंता राजपाल वाणे यांनी दुय्यम निबंधक बी. एन. टगेवार यांचेकडून खरेदीखताव्दारे करून घेतली. कोरडवाहू शेती असताना, ती ओलीताची दाखवित हा गैरप्रकार करण्यात आला. शेतीचा आकार ९.४० असताना खरेदी करतेवेळी तो १०.४० असा करण्यात आला. खडकाचे दर वापरता इतर जिल्ह्यातील सुपिक जमिनीसाठी असलेले खरेदी दर वापरून २० लाख ५५ हजार ७९४ रूपयाचा अधिक मोबदला लाटल्याची तक्रार संघर्ष समितीने जिल्हाधिकाºयासह पाटबंधारे विभाग व पोलिसात डिसेंबर २०१३ मध्ये केली होती. तक्रारीवरून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी भुसंपादनात दोषी असलेल्या तलाठ्यावरही कारवाई केली. मात्र पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने १३ मे २०१४ रोजी संघर्ष समितीचे विजय राउत यांनी आर्णी च्या दिवाणी न्यायालयात शेतकरी लिंगावार यांचेसह बोरसे, वाणे व टगेवार यांच्या विरोधात प्रकरण दाखल केले. त्यावरून आज आर्णी येथील प्रथम श्रेणी दंडाधिकारी तुषार आगलावे यांनी या प्रकरणाचा निकाल देत संबधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आर्णी पोलिसांना दिले. त्यावरून पोलिसांनी फसवणूकीसह विविध कलमान्वये गून्हे दाखल केले आहे. या प्रकरणात संघर्ष समितीच्यावतीने अ‍ॅड. प्रमोद चौधरी यांनी काम पाहिले. या निर्णयाचे स्वागत समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटिल जगताप, मुबारक तंवर, अ‍ॅड. बालाजी येरावार, प्रल्हाद गांवडे, मिलिंद श्ािंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 + = seven