नेपाळमध्ये बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, मृतांचा आकडा २३००

earthquake
काठमांडू – नेपाळमध्ये बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी भारताची बचावकार्य करणारी टीम नेपाळमध्ये दाखल झाली असून भारतीयांना प्राधान्याने मदत होत आहे. भारत सरकारने या बचाव मोहिमेला ऑपरेशन ‘मैत्री’ असे नाव दिले आहे. तसेच अमेरिकेने नेपाळसाठी १० लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. तर कॅनडाने नेपाळसाठी पाच दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.
नेपाळमध्ये शनिवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास भूकंपाने हाहाकार माजविला आहे. धरणीमाय कोपल्याने मृत्यूचे तांडव नेपाळमध्ये सुरु आहे. उत्तर भारतातही या भूकंपाचा फटका बसला आहे. या ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपातील मृतांची संख्या २३०० वर पोहचल्याचे समजते. अजूनही मोठ्या-मोठ्या इमारतीखालून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गापुढे सर्वांनीच हात जोडले असून नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी मोकळ्या पटांगणात पूर्ण रात्र जागून काढली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× nine = 54