
रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील नेरळ येथील मोहाची वाडी इथे घराची भिंत कोसळून 5 जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
मुसळधार पावसाने आता बळी घ्यायला सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील नेरळ येथील मोहाची वाडी इथे घराची भिंत कोसळून 5 जण ठार झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत एकाच घरातील चारजणांचा मृत्यू झाल्याचे समजते. पहाटे साडेपाच वाजेची ही घटना आहे. किसन दिघे, सुनंदा दिघे, जाईबाई कदम, अर्चना दिघे यांचा मृत्यू झाला आहे.
सलग सुरू असणार्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह रायगड परिसरातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. रायगड जिल्ह्यात 24 तासातसरासरी 137 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.









