
पुणे – भू संपादन कायद्याविरोधात भाजपा सरकारविरोधात निर्दशने करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कायद्याताली वादग्रस्त कलमांसंबंधी खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.
भू संपादन कायद्याविरोधात गडकरींनी विरोधी पक्षांना चर्चेचे निमंत्रण दिल्याप्रकरणी अण्णांना विचारले असता ते म्हणाले, गडकरी यांचा गृहपाठ कच्चा आहे. आम्ही पंतप्रधान मोदींसह या कलमांवर खुली चर्चा करण्यास तयार आहोत.
‘लोकांनाही ही खुली चर्चा पाहू द्या आणि या कायद्यातील मुद्दे समजून घेऊ दे’, असे अण्णा यांनी राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना भू संपादन कायद्याबाबत खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले होते.









