
यवतमाळ, दि. १९ – जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेने केलेल्या विकासामध्ये संचालक मंडळासोबतच कर्मचाºयांचे योगदान सुध्दा अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन राजूदास जाधव यांनी केले.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा सध्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सप्ताहात सर्व कर्मचाºयांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सचिव राजेंद्र राऊ त, संचालक शेख लुकमान, सुमाला पुडके, वनमाला मेटे, डॉ. दिलीप चौधरी, संजय गावंडे, शरद घारोड, साहेबराव राठोड, गौतम कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी सरव्यवस्थापक वसंत राठोड, दिपक पाटणे, अशोक पेटेवार, शालीक दानखडे यांनी आपले विचार व्यक्त आहे.









