पतीने जाळून घेतले – पतीचा मृत्यू, वाचविण्याच्या प्रयत्नात पत्नी भाजली

0614_fire1
कळंब दि. २७ – कौटुंबिक कलहातून वाद निर्माण झाल्याने रागाच्या भरात पतीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये सदर इसमाचा मृत्यू झाला तर वाचविण्यासाठी गेलेली त्याची पत्नीही गंभीरपने भाजली असून मृत्यूशी झुंज देत आहे. तालुक्यातील बोरी महाल येथे गुरुवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली असून गावात खळबळ उडाली आहे.
गणेश सिताराम मेश्राम (३८) असे मृतकाचे तर सुनंदा गणेश मेश्राम (३०) रा. बोरी महाल असे जखमी पती-पत्नीची नावे आहेत. गणेश हा पत्नीसोबत सतत क्षुल्लक कारणावरून वाद करून भांडण करीत होता. अशातच शुक्रवारी २६ फेबु्रवारी रोजी रात्री ८ वाजता पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात गणेशने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यावेळी त्याला वाचविण्यासाठी गेलीली त्याची पत्नी सुनंदा ही गंभीरपणे भाजली. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईक व गावकºयांनी मेश्राम दाम्पत्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ९० टक्के जळाल्याने गणेशचा रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर ६० टक्के भाजलेली सुनंदा ही मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. त्याच्या मागे दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven − 7 =