पत्नी पळाल्याने पतीची आत्महत्या

ठाणे : पत्नीचे शेजारील तरुणासोबत असणारे अनैतिक संबंध तसेच त्याच्यासोबत पळून गेल्याने नालासोपारा येथे राहणाऱ्या श्रीधर शेट्टी याने आपल्या दोन मुलींची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला वैतागून पतीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
‘मेरी औरत साथ देती तो मैं ऐसा कदम नहीं उठाता.’ आत्महत्येपूर्वी श्रीधरने घरामधील भिंतीवर असे लिहल्याचे तपासात आढळून आले आहे. श्रीधरची पत्नी त्याला काही दिवसांपूर्वीच सोडून दुसऱ्या युवकासोबत पळून गेल्याने मानसिक तणावाखाली येऊन मुलींची हत्या करुन त्याने आपले स्वत:चे देखील आयुष्य संपवले.श्रीधर शेट्टी (वय, ४२) याची पत्नी सोनाली हि शेजारी राहणाऱ्या तेजस अनूप दोशी याच्यासोबत पळून गेली. मात्र १६ फेब्रुवारीला ती घरी परत आली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. ‘माझं तेजसवर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत राहणार आहे.’ असा हट्टच सोनालीने धरला. या भांडणानंतर श्रीधरने आपल्या मुलींना सोडून घरात निघून जाण्यास सोनालीला सांगितलं. त्यानंतर सोनाली तेजससोबत राहू लागली. मात्र या दरम्यान श्रीधर पूर्णपणे खचून गेला. पोलिसांच्या मते, मंगळवारी १८ फेब्रुवारीला सोनाली आणि तेजस पुन्हा कुठेतरी बाहेर निघून गेले. याने श्रीधर जास्तच अस्वस्थ झाला. त्यानंतर रात्री ८ ते ९ च्या दरम्यान त्याने आपल्या दोन्ही मुली श्रद्धा (वय, ९) साहिध्या (वय, ५) यांची उशीने दाबून हत्या केली त्यानंतर त्याने आत्महत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight × = 48