पाकिस्तानचा भारताच्या २० चौक्यांवर गोळीबार

Militants target security forces convoy in Srinagar
जम्मू – पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून, रविवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील वीस भारतीय चौक्यांवर आणि नागरी वस्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक गावकरी जखमी झाला आहे.
पाकिस्तानी रेंजर्सनी अर्निया आणि आरएस पूरा सेक्टरमधील भारतीय़ चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानने स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी गोळीबार करताना उखळी तोफांचाही मारा केला अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिका-याने दिली. सीमेवर तैनात असणा-या बीएसएफ जवानांनीही स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा वापर करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. रविवारी रात्री सुरु झालेला गोळीबार सोमवारी सकाळी साडेसहा वाजता थांबला. अतार सिंह हा गावकरी या गोळीबारात जखमी झाला. पाकिस्तानने चौक्यांबरोबर नागरी वसत्यांवरही गोळीबार केला. या वर्षात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यातील हा सर्वात मोठा हल्ला केला. येत्या २५ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा होणार आहे. त्यापूर्वी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. मागच्या दहा दिवसात पाकिस्तानने अकरावेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× two = 12