पाक शोकमग्न, भारताने पाळले मौन

shok
नवी दिल्ली – पाकिस्तानात सैनिकी शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या निरपराधांना आज संपूर्ण भारतभर श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन मिनिटं मौन पाळून शाळा-शाळांमधून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान, संसदेनेही या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला.
तालिबानी सैतानांनी निष्पाप मुलांचे निर्दयीपणे प्राण घेतल्याने जगभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध होत आहे. या संकटात भारतानेही पाकिस्तानसाठी आपली सहवेदना दर्शविली आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी रात्रीच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली व तीव्र शब्दांत शोक व्यक्त केला. त्यानंतर पंतप्रधानांनी देशभरातील शाळांमध्ये दोन मिनिटं मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आज बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मौन बाळगून या हल्ल्याचा निषेध केला. ‘या कठिण प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असा संदेश या माध्यमातून भारताने पाकिस्तानला दिला आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज पेशावरमधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दोन मिनिटं मौन पाळून सदस्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेत शोकसंदेशही वाचून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 × = ten