
उमरखेड, दि. ८ – हिवाळ््यातच पाणीटंचाई पेटालयाला लागले आहे. इसापूर धरणाचे पाणी पिण्यासाठी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ३४ जणांनी बिटगावपासून सात किलोमिटर अंतरावर असलेल्या कोठा तांंडाच्या नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे. बिटरगाव, कोठा, भोजनगर, रतननगर, गणेशवाडी, या गावातील नागरिकांचा समावेश आहे. इसापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी दरवर्षीच पैनगंगा नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे गांजेगावपासून सहस्त्रकुंड पर्यंतच्या गावापर्यंत नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. चार टिएमसी पाणी काही दिवसापूर्वी सोडण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. मात्र पाणी गांजेगाव बंधाºयाच्या समोर गेले नाही. इसापूर धरणातून सहा टिएमसी व मराठवाडा येथून तेवढेच आरक्षीत पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या आंदोलनात सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक विजय रुडे, उत्तम देवकते, संजय देवकते, संजय करपे, अरुण राठोड, शंकर हामंद, गणेश राठोड, उत्तम राठोड, लक्ष्मण राठोड, हमिद खान, सुरेश गायके, रतन राठोड, उल्हास जाधव, युवराज राठोड, सुरेश पवार, संजीव राठोड, गोपिनाथ केंद्रे, रामराव पाटील, नारायण देवकते, भारत पवार, माधव भलगे आदींचा समावेश आहे. या आंदोलनाला परिसरातील जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.









