पाण्यासाठी महिलेला पेटविले

यवतमाळ – पाणी भरण्याच्या कारणावरून तीन जणांनी महिलेच्या अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिल्याची घटना शनिवारी झाडकिन्ही येथे घडली. २२ फेबु्रवारी रोजी कविता नामक महिला पाणी भरत होती. अशातच  गावातीलच हरिचंद्र पैकु पाटील (४०) व अन्य दोन व्यक्तीने या महिलेसोबत वाद केला. त्यानंतर तीच्या अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ही महिला गंभीररित्या भाजली असून तीच्यावर वसंतराव नाईक महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. जिल्ह्यात उन्हाळ््यात पाणी टंचाई निर्माण होऊन वाद होतांना दिसतात. मात्र यावर्षी जोरदार पाऊस झाला असून  भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही. तरीही फेबु्रवारी महिन्यात पाणी भरण्याच्या कारणावरून सदर महिलेला पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची तक्रार महिलेचे वडील मोतीराम भाऊराव चौधरी (६५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार बाळु गायगोले करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 − one =