पालकमंत्र्याच्या इशाºयावर अतिक्रमण हटविले, जाबुवंतराव धोटे यांचा आरोप

jambuvant dhote 1
यवतमाळ, दि. ११ – नेताजी भवन व व्यवसायीकांची दुकाने पालकमंत्री संजय राठोड यांच्या इशाºयावर प्रशासनाने हटविल्याचा आरोप विदर्भवीर जाबूवंतराव धोटे यांनी आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. ही कारवाई लोकशाहीचा खून करणारी असून, जशास तसे उत्तर देणार असल्याचे धोटे यांनी सांगितले.
शहरात ३ जानेवारीपासून नगर पालिका, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. रहदारी व वाहतुकीच्या दृष्टीने रस्ते मोकळे असणे आवश्यक आहे. मात्र अतिक्रमणधारकांचे पुर्नवसन करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने आधी उपाययोजना करून दुकानांवर बुलडोजर चालवायला हवा होता. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचेसह इतर अधिकाºयांनी अतिक्रमण हटविण्यात येणार नाही असे बैठकीत सांगितले होते. मात्र दुसºया दिवशी सकाळी ७ वाजताच बुलडोजर लावून दुकाने पाडण्यात आली. त्यामुळे ही कारवाई पालकमंत्री संजय राठोड यांच्या सांगण्यावरून झाली आहे. ७५० व्यवसायीकांचा रोजगार हिरावणाºया पालकमंत्र्यानी केवळ नेताजी भवन हटविण्याच्या हेतूने केलेला हा प्रकार असल्याचे जांबुवंतराव धोटे यांनी सांगितले. अतिक्रमण हटवितेवेळी नेताजी भवनातील महापुरूषांच्या प्रतिमांची विटंबना झाली असल्याचा आरोप करीत संजय राठोड यांचे मंत्रीपद काढून घेण्यात यावे अशी मागणी धोटे यांनी केली. या प्रकाराचे उत्तर आपण देणार असून, त्यासाठी १३ जानेवारीला जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले असून, त्या सभेतच आपण भुमिका स्पष्ट करणार असल्याचे जांबुवंतराव धोटे यांनी सांगितले. यावेळी विजया धोटे, क्रांती धोटे, लालजी राऊत, प्रभाकर काळे व व्यवसायीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× nine = 45