पालघरजवळ भीषण अपघातात, चार महिलांचा मृत्यू

Palghar-Accident
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर सोमवारी पहाटे टाटा मॅजिक आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघात चार महिलांचा मृत्यू झाला.
पालघर येथील नवझे गावातील एका गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला तात्काळ उपचारासाठी टाटा मॅजिक रिक्षातून रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने रिक्षा वरई रस्त्यावरील गुंदावे येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकवर जाऊन आदळली. पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या या अपघातात गर्भवती महिलेसह अन्य तीन महिलांचा मृत्यू झाला.भारती भरत पाटील (आशा), भानुमती भाऊ लाबड, संगीता कल्पेश चिमडा आणि यमुना उध-या दोड अशी या अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 + = fourteen