
पुसद – एका सामाजिक कार्यक्रमानंतर पोलीस अधिकारी व राजकीय नेत्यात झालेल्या किळकोळ वादामुळे आक्रमक झालेल्या जमावाने दगडफेक करीत अनेक वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे.
आज सकाळी शिवाजीनगरात एका सामाजिक कार्यक्रमादरम्यान नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम व साहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्यात किरकोळ वाद झाला. यामुळे ४०० ते ५०० जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर गेला. पोलीस अधिकाºयावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील यांनी सदर साहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली तत्काळ कंट्रोल रुमला केल्याचे सांगितले. यावर मोर्चेकºयांचे समाधान झाल्याने ते माघारी फिरले. काही दूर येत नाही तोच अचानक दुचाकी,चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी परिस्थितीतीवर नियंत्रण मिळविले. या घटनेचे वृत्त शहरात पसरताच व्यापाºयांनी लागलीच आपली प्रतिष्ठाने बंद केली. या दगडफेकीत अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असून, वाहनधारकांनी पुसद पोलिसात तक्रार दिली आहे. तोडफोड करणाºयांना अटक करण्याची मागणी शिवसेना व भाजपाच्या वतीने करण्यात आल्यानंतर व्यापाºयांनी पुन्हा आपली दुकाने बंद केली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे यांनी पुसद गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.









