प्रत्येकाने बुद्धांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करावा – मोदी

2

नवी दिल्ली – सत्ता आणि वैभव सोडणे खूपच कठीण आहे. गौतम बुद्धांनी सत्ता सोडून करुणेचा मार्ग निवडला. समाज जिवनासाठी बुद्धांनी जो मार्ग दाखविला आहे, त्याच मार्गाचा प्रत्येकांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अनेक देशांच्या राजदुतांनी व केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली. पुढे बोलताना म्हणाले की, २१ व्या शतकात हे अशियाचे असले तरी ते बुद्धशिवाय नाही. दुसऱ्याच्या कल्याणाशिवाय परलोकी तर सोडाच पण संपूर्ण जागात तुम्हाला सुख मिळणार नाही, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 + five =