
यवतमाळ, दि. ९ – क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला करणाºया आरोपीस दोन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला. आज गुरूवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अरविंद वानखेडे यांनी हा निकाल दिला.
दशरथ गुलाब चव्हाण (५५) रा. बाणगाव ता. नेर असे आरोपीचे नाव आहे. २७ सप्टेंबर २०१० रोजी आरोपीने करणी केल्याच्या वादातून घराशेजारी राहणाºया इंदल गोपीचंद आडे यांच्या पोटावर सुरीने वार करून खुन करण्याचा प्रयत्न केला. जखमी इंलवर ग्रामीण रुग्णालय नेर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले. याप्रकरणी उध्दल गोपीचंद आडे यानी दिलेल्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी आरोपी दशरथ चव्हाण याच्याविरुद्घ भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासा दरम्यान अतिरिक्त भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी ठाणेदार मल्लीकार्जुन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक आर.जी. माहुरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक युवनाते यांनी तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अरविंद वानखेडे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावनी पार पडली. यामध्ये दोन्ही पक्षाची बाजु ऐंकुण १३ साक्षीदार तपासले. त्यामध्ये जखमी इंदल व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी दशरथला दोन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरीक्त शासकीय अभियोक्ता नरेंद्र बी. मेश्राम यांनी युक्तीवाद केला.









