प्रेमविवाह करून पत्नीचा छळ ,वकीलासह चौघांना अटक

यवतमाळ – शहरातील एका युवकाने नाशिकच्या युवतीसोबत प्रेमविवाह करून तीचा छळ करणाºया वकीलासह चार जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली.
संदिप लिलाधर जोशी, दिपक लिलाधर जोशी, उषा उपाध्याय, बाला त्रिवेदी सर्व रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी अशी आरोपींची नावे आहे. मुळ नाशिक येथील रुपाली ही २००९ मध्ये एका कामानिमित्त यवतमाळ येथे आली होती. त्यावेळी तिची ओळख वकील असलेल्या संदीप जोशी या युवकासोबत झाली होती. या ओळखीचे रुपांत प्रेमात झाल्यानंतर २० एप्रिल २००९ रोजी त्या दोघांनी अकोला येथे आंतरजातीय प्रेमविवाह केला. वर्षभर संसार सुरळीत असताना संदिपच्या वागण्यात बदल होऊन त्याने शारीरीक व मानसिक त्रास देणे सुरु केले. त्याचे अन्य मुलीबरोबर प्रेमप्रकरण सुरू असल्याचेही रुपालीच्या लक्षात आले. याबाबत जाब विचारला असता तीला मारझोड सुरू केली. अशातच २०१३ मध्ये तीला गर्भधारणा झाली. ही बाब संदीपच्या लक्षात येताच त्याने तिला औषध देवून गर्भपात केला. तसेच माहेरच्यांनी दिलेले ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले होते. सतत सुरु असलेल्या या त्रासातून रुपालीने कशीबशी सुटका करून आई-वडीलांकडे नाशिक येथे निघून गेली. काही दिवसानंतर तीने यवतमाळ येथे परत आली असता संदीप शहर सोडून गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी रुपालीने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता तू तुझे बघुन घे असे सांगण्यात आले. त्यामुळे रूपालीने वडगाव रोड ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून नाशिक येथील अंबाड पोलिस ठाण्यात वर्ग केला होता. दरम्यान दोन दिवसापासून तो यवतमाळात लोकेशन असल्याने अंबाड पोलिस ठाण्याच्या सहा. पोलीस निरीक्षक धनश्री पाटील आज शहरात दाखल झाल्या. त्यांनी वडगाव रोडचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक मसराम, पोलीस उपनिरीक्षक मंगला वाकोडे यांच्या मदतीने विदर्भ हाऊसिंगमध्ये धाड टाकून आरोपी संदिप,जोशी, उपाध्याय, त्रिवेदी याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three × 8 =