
यवतमाळ – महागांव तालुक्यात मोठयाप्रमाणावर शेतकºयांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून बंजर जमिनीवर पिके काढुन शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेती वहीती करत आहेत. आज शनिवारी वनविभागाने वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वनविभाग व पोलिसांच्या सयुक्त कार्यवाहीत माळेगाव येथील वन जमिनीवर असलेले शेतकºयांचे अतिक्रमण बंदुकीच्या फैरी झाडून मोकळे करण्यात आले.
तालुक्यातील माळेगाव येथे सन १९७९ पासून वन जमिनीवर अमर मोतीराम राठोड व गोकुळ दरूसिंग राठोड या शेतकºयांनी जमिनीवर वहीती सुरू केली. दोन्ही शेतकºयांनी पाच-पाच एक्कर जमीन सुपीक केली होती. या जमिनीवर शेतकºयांनी वनविभागाने आकारलेला दंड भरला होता. आता आपण जमिनीचे खरे मालक झाले आहे. या अनंदात शेतकरी वावरत असतांना जवळ पास २०० च्यावर वन अधिकारी व कर्मचारी पोलीस यांनी शेतात जावून जमिन वहीती करता येत नाही, असे सांगून ताबडतोब शेतातून निघून जा अन्यथा आम्हाला जबरदस्ती ने काढावे लागेल, असे सांगत बंदुकीच्या फैरी आकाशात झाडून दहशत निर्माण केली. त्यामुळे भयभित होऊन शेतकºयांनी शेतातून परत जाने पसंद केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळलानतंर वनविभागाच्या कर्मचाºयांनी उभ्यापिकात शेकडो जनावरे सोडून पीक उध्दस्त केले. त्यामुळे शेतºयात चितेंचे सावठ असून, जगावे की मरावे असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा टाकला आहे. लोकप्रतिनिधी नी शेतकºयांचे हित पाहता काही तरी करावे. असी आपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे. ही मोहीम यशस्वीकरण्यासाठी महागाव, उमरखेड, पुसद, काळी दौ, येथील वन अधिकारी कर्मचारी व पोलिसांना पाचारन करण्यात आले होते.









