
नागपूर – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बलात्कार पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बलात्कारानंतर होणारी वैद्यकीय तपासणी हा पीडित महिलेसाठी एक धक्कादायक अनुभव असतो.
या बदलांनंतर वादग्रस्त टू फिंगर चाचणी बंद होणार आहे. बलात्कार पीडित महिलेच्या उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्वे आखली आहेत. या मार्गदर्शकतत्वानुसार आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक रुग्णालयाला बलात्कार पीडित महिलेच्या न्यायवैद्यक आणि वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.आरोग्य संशोधन विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था आणि तज्ञांनी मिळून ही राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. पीडित महिलेला बलात्काराच्या आघातातून सावरण्यास मदत व्हावी यासाठीही आरोग्य संशोधन विभागाने मार्गदर्शकतत्वे आखली आहेत. यामध्ये समुपदेशनाचा समावेश आहे.









